तुम्हाला 8 मार्च – जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करून समानतेसाठी आपला लढा दृढ करण्याचा दिवस म्हणून जगभरात 8 मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो.
भारतातील महिलांना सर्वप्रथम हक्क प्रदान केले ते भारतीय संविधानाने!समानता, स्वातंत्र्य व सन्मान ही केवळ संविधानातील शब्द नसून स्त्रीच्या जगण्याची मूलभूत तत्त्वे आहेत. संविधानाने महिलांना अधिकार दिले, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव तेव्हाच येईल, जेव्हा समाज म्हणून आपण ते अधिकार मान्य करू, पाळू आणि संरक्षण करू. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि समानतेसाठी संघटित होणे—हाच संविधानाचा खरा अर्थ आहे. जागतिक महिला दिनानिमित्त खालील उपक्रम राबवू शकता.
आपण आपल्या सोसायटी/मोहल्ला/वस्ती मध्ये लोकांना गोळा करून शपथ देऊ शकतो. आपण जिथे काम करतो, मित्रांमध्ये शपत देऊ शकतो. तसेच शाळांमध्ये/कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देऊ शकतो. सोबत पत्रकं वाटू शकतो.
संघर्षातून उभ्या राहिलेल्या – विधवा किंवा एकल महिला, प्रतिकूल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या, सामाजिक जाणीव असलेल्या, घरगुती आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात लढलेल्या, कर्मचारी युनियनचे काम करणाऱ्या, समाजाने आखून दिलेल्या चूल व मूल ह्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करणे. त्यासाठी लागणारे सन्मान प्रमाणपत्रासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता.
भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या सन्मान, हक्क व समतेचा अर्थ चित्रमय पद्धतीने उलगडणारी ही पुस्तिका आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया!
संविधान सभेतील 15 महिलांविषयी त्या भूमिकेत जाऊन 15 महिलांना घेऊन त्यांची भूमिका आणि जीवनपट सादर करणारा कार्यक्रम करू शकता.
“भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलांना शिक्षण
बेरोजगारांना रोजगार, बेघराला आधार, उघड्या-नागड्यांना कपडे,
आजारी लोकांना औषध, मूक प्राण्यांना संरक्षण, गरीब लेकरांचे लग्न सुगम करणे…
हाच खरा धर्म, हीच खरी भक्ती अन् दरिद्रीनारायणाची सेवा हीच खरी देवपूजा “
संत गाडगेबाबांची दशसुत्री अंमलात आणणे म्हणजे लोककल्याण करणे. हाच आपल्या संविधानाचा मुख्य उद्देश्य आहे. त्यामुळे,
स्टिकर व पोस्टर (डाउनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)
घरोघरी जाऊन, साखर देऊन, तोंड गोड करा आणि लोकांशी संविधानाबद्दल संवाद करा. संविधानावरील पत्रक त्यांना देऊ शकता. पत्रक इथून डाउनलोड करू शकता.
संविधान उद्देशिकेतील शब्दांची व संविधान मूल्यांची सोप्या उदाहरणांनी संवादात्मक भाषेत मुलांना सांगणे.
समता, बंधुता या मूल्यांना खेळाच्या माध्यमातून हसत खेळत समजून घेणे.
संविधानाची रंगीत चित्रमय पॉकेट पुस्तिका (रु. 15) छापली आहे. त्यावर प्रश्नपत्रिका तयार आहे. आपण आपल्या किंवा शेजारील शाळेत त्यावर परीक्षा घेऊ शकता. त्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देऊ शकता.
प्रश्नपत्रिका संच इथून डाउनलोड करू शकता.
प्रमाणपत्रासाठी आम्हाला संपर्क साधू शकता.
प्रास्ताविकेतील शब्दांची ओळख करून देणारी 5 मिनिटांची संवादात्मक स्क्रिप्ट आपण सादर करू शकता.
संविधान दिनी आपण संविधानावरील शपथ शाळा-कॉलेजमध्ये घेऊ शकता.
खालील लिंकवरून आपण A2/A3 साईझचे पोस्टर छापून आपल्या शाळेच्या-संस्थेच्या आवारात लावू शकता.
विद्यार्थ्यांच्या मार्फत संविधानाने मला काय दिले हे सांगणारे पत्र आपल्या घरी-शेजारी वाचू शकतात. पत्र इथून डाउनलोड करू शकता.
साध्या सोप्या भाषेत संविधान समजून देणारी चित्रमय पुस्तिका वाटप करू शकता.

भारतीय संविधान म्हणजे एक करुणेचा, मानवतेचा व प्रगतीचा प्रकाशदीप आहे. संविधानाने सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा हक्क दिला. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य दिले. गरीबांना, वंचितांना पुढे जाण्याची संधी दिली. या देशातील विविधतेचा सन्मान केला.
व्यक्ती कोणत्याही धर्म, जात, लिंग, प्रांताचा असो, प्रत्येक भारतीयाचा भारतावर आणि संविधानावर समान हक्क आहे. अशाप्रकारे संविधानाने प्रत्येक भारतीयाला सामावून घेतले.
आपल्या गावातील शाळा, दवाखाने, रस्ता, वीज, पिण्याचे पाणी, आणि देशाचा 75 वर्षातला विकाससुद्धा संविधानामुळेच शक्य झाला. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाशापर्यंत आपण पोहोचलो.
“जेव्हा तुम्ही गोंधळलेले असाल, आणि काय निर्णय घ्यायचा हे तुम्हाला कळत नसेल, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सर्वात गरीब, दुबळ्या माणसाला आठवा आणि तुमचे पाऊल त्याच्यासाठी आहे ना, याची खात्री करा” असं महात्मा गांधी म्हणायचे. याच प्रेरणेने आपलं संविधान देखील समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करून बनवलं गेलं आहे.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “सामाजिक चेतना हीच आपल्या हक्कांची खात्री असते.” म्हणजे लोक जागृत असले तरंच संविधानाने दिलेले हक्क मिळू शकतात.
आपल्या संविधानाला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. चला, संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लोकांपर्यंत भारतीय संविधानाचा विचार घेऊन जाऊया…
संविधान जागर अभियान निमंत्रक समिती:
मा. न्या. बी. जी. कोळसे पाटील, मा. न्या. अभय ठिपसे, मा. न्या. तानाजी नलावडे,
तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. नितीन राऊत, धनाजी गुरव, नीरज जैन
अधिक माहितीसाठी संपर्क:
स्वप्निल फुसे: 79723 45764
डॉ. श्याम मुडे: 94047 08852
श्रद्धा रेखा राजेंद्र: 92704 78335
राजाभाऊ करवाडे: 98222 02739