2026 हे वर्ष म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्ष आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे. महात्मा फुलेंनी आणि बाबासाहेबांनी सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. कोणत्याही विशेष जातीसाठी नव्हे तर सर्व भारतीयांना माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगता यावे यासाठी त्यांचा संघर्ष होता. आधुनिक भारताच्या जडण-घडणीमध्ये या महामानवांचे अमूल्य योगदान आहे. याची जाणीव घरोघरी पोहोचवण्यासाठी आपण विविध उपक्रम राबवूयात.
8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह आपल्या गावात-वस्तीत साजरा करा, खाली विविध प्रकारचे साहित्य डाउनलोड साठी उपलब्ध आहे.
महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाचा हक्क नाकारलेल्या महिलांसाठी आणि बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली. ते आपल्या सगळ्यांचे आद्य शिक्षक आहेत. त्यांच्या आठवणीत आपण आपल्या शिक्षकांचा सत्कार करूया. ते करताना त्यांना एक सन्मानपत्र देऊया. सन्मान पत्रासाठी संपर्क करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मार्गावर चालण्याचा वसा घेणारी प्रतिज्ञा ठिकठिकाणी कार्यक्रमात घेऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सोपवतानाचा एक सेल्फी बॅनर तयार करून आपण मंडळ/शाळा/कॉलेज/कॉलनी/किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी ठेवून लोकांना सेल्फी काढण्यासाठी आवाहन करू शकता. त्यांसोबत संविधानावर चर्चा करू शकता.
घरोघरी जाऊन, साखर देऊन, तोंड गोड करा आणि लोकांशी संविधानाबद्दल संवाद करा. संविधानावरील पत्रक त्यांना देऊ शकता. पत्रक इथून डाउनलोड करू शकता.
संविधान उद्देशिकेतील शब्दांची व संविधान मूल्यांची सोप्या उदाहरणांनी संवादात्मक भाषेत मुलांना सांगणे.
समता, बंधुता या मूल्यांना खेळाच्या माध्यमातून हसत खेळत समजून घेणे.
संविधानाची रंगीत चित्रमय पॉकेट पुस्तिका (रु. 15) छापली आहे. त्यावर प्रश्नपत्रिका तयार आहे. आपण आपल्या किंवा शेजारील शाळेत त्यावर परीक्षा घेऊ शकता. त्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देऊ शकता.
प्रश्नपत्रिका संच इथून डाउनलोड करू शकता.
प्रमाणपत्रासाठी आम्हाला संपर्क साधू शकता.
प्रास्ताविकेतील शब्दांची ओळख करून देणारी 5 मिनिटांची संवादात्मक स्क्रिप्ट आपण सादर करू शकता.
संविधान दिनी आपण संविधानावरील शपथ शाळा-कॉलेजमध्ये घेऊ शकता.
खालील लिंकवरून आपण A2/A3 साईझचे पोस्टर छापून आपल्या शाळेच्या-संस्थेच्या आवारात लावू शकता.
विद्यार्थ्यांच्या मार्फत संविधानाने मला काय दिले हे सांगणारे पत्र आपल्या घरी-शेजारी वाचू शकतात. पत्र इथून डाउनलोड करू शकता.
साध्या सोप्या भाषेत संविधान समजून देणारी चित्रमय पुस्तिका वाटप करू शकता.

भारतीय संविधान म्हणजे एक करुणेचा, मानवतेचा व प्रगतीचा प्रकाशदीप आहे. संविधानाने सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा हक्क दिला. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य दिले. गरीबांना, वंचितांना पुढे जाण्याची संधी दिली. या देशातील विविधतेचा सन्मान केला.
व्यक्ती कोणत्याही धर्म, जात, लिंग, प्रांताचा असो, प्रत्येक भारतीयाचा भारतावर आणि संविधानावर समान हक्क आहे. अशाप्रकारे संविधानाने प्रत्येक भारतीयाला सामावून घेतले.
आपल्या गावातील शाळा, दवाखाने, रस्ता, वीज, पिण्याचे पाणी, आणि देशाचा 75 वर्षातला विकाससुद्धा संविधानामुळेच शक्य झाला. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाशापर्यंत आपण पोहोचलो.
“जेव्हा तुम्ही गोंधळलेले असाल, आणि काय निर्णय घ्यायचा हे तुम्हाला कळत नसेल, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सर्वात गरीब, दुबळ्या माणसाला आठवा आणि तुमचे पाऊल त्याच्यासाठी आहे ना, याची खात्री करा” असं महात्मा गांधी म्हणायचे. याच प्रेरणेने आपलं संविधान देखील समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करून बनवलं गेलं आहे.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “सामाजिक चेतना हीच आपल्या हक्कांची खात्री असते.” म्हणजे लोक जागृत असले तरंच संविधानाने दिलेले हक्क मिळू शकतात.
आपल्या संविधानाला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. चला, संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लोकांपर्यंत भारतीय संविधानाचा विचार घेऊन जाऊया…
संविधान जागर अभियान निमंत्रक समिती:
मा. न्या. बी. जी. कोळसे पाटील, मा. न्या. अभय ठिपसे, तुषार गांधी,
डॉ. राम पुनियानी, डॉ. नितीन राऊत, धनाजी गुरव, नीरज जैन
अधिक माहितीसाठी संपर्क:
स्वप्निल फुसे: 79723 45764
डॉ. श्याम मुडे: 94047 08852
श्रद्धा रेखा राजेंद्र: 92704 78335
राजाभाऊ करवाडे: 98222 02739