महाड सत्याग्रह ते भारतीय संविधान
चवदार तळ्याच्या काठी, रोवून पाय खंबीर
राहिला उभा शोषितांचा, सेनानी रणगंभीर…
आधुनिक भारत घडवण्यासाठी, संविधान निर्मीतीसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत व्यापक आणि मोलाचे योगदान दिले आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे 20 मार्च 1927 रोजी पुकारलेला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह. 20 मार्च 2026 रोजी ऐतिहासिक महाड सत्याग्रहाच्या शतकपूर्ती वर्षाला सुरूवात होत आहे. या निमित्ताने पत्रक वाटून लोकांशी संवाद साधुया.



Leave a Reply