ईद निमित्त बंधुतेचा गोडवा पसरवूया

धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव हे भारतीय संविधानाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरांचे जतन करणे आणि बंधुभाव जोपासणे हे भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये नमूद केले आहे.

आपले सण आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. जेव्हा आपण सर्व मिळूण सण साजरे करतो तेव्हा विविध समाजघटकातील लोकांचा एकमेकांशी सामाजिक संवाद विकसित होण्यास मदत होते. आम्ही हे मानतो की, सगळे सण उत्सव सगळ्यांचेच आहेत, मग ती दिवाळी असो, ईद असो, ख्रिसमस असो, गुरुनानक जयंती, बुद्धपौर्णीमा किंवा अजुन कोणताही सण.

म्हणूनच ते सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत. सणांमध्ये कधी द्वेष नसतं, प्रेमच प्रेम असतं. संविधानामध्ये असलेला एकोपा जपण्यासाठी चला, आपण सर्व सण व उत्सव एकत्र साजरे करूया. येत्या महिन्यात ईद येत आहे. त्यासाठी पुढील प्रस्ताव:

1. रोजा ठेवत असलेल्या तुमच्या एक (किंवा अधिक) मित्र/मैत्रीणला एक दिवस इफ्तारला (उपास सोडण्यासाठी) घरी बोलावा.

2. ईद निमित्त तुमच्या मुस्लिम मित्रांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्या.